❗💧श्रीराम समर्थ💧❗
अमृतधारा - ८३
भगवंताकरता मी आहे हे अनुसंधान राहण्याकरता "आनंद त्याच्यावाचून कोठे नाही " हे स्मरण पाहिजे.
ते राहण्याकरता ती अवस्था मुरून जाण्याकरता नाम घेणे जरूर आहे.
प्रपंच सुखही देत नाही व दुःखही देत नाही.
दोन गोष्टी अपायकारक आहेत,
१) फार लोभ
२) कंटाळा
ही दोन देहबुद्धीची लक्षणे आहेत.
क्रिया करावी पण बाधा न होईल असे वागावे. हेतु असेल तर क्रिया बाधक होते.
देव ठेवील तसे राहणे, फार विचार न करता राहणे हाच परमार्थ.
भगवंताच्या निष्ठेने मोठे समाधान व निवांतपण येते,(त्यासाठी निरंतर नाम घ्यावे).
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment