14 Feb 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - १२५


(आपल्याला) वस्तू नको, पण काय पाहिजे ते कळत नाही. माणूस करमणूक करून घेतो, पण खरा आनंद मिळत नाही. 


बाहेरच्या सुखाची साधने आली. पण त्याने देहाचे सुख वाढले व परावलंबीत्व आले. 


जेथे परावलंबित्व असते तेथे समाधान कमी असते. 


पण ही सुखाची साधने व व्यवहार टाळता येणार नाहीत. मग त्यात (अलिप्तपणे) कसे राहायचे ते ठरवले पाहिजे. 


व्यवहारातील सर्व गोष्टी स्वप्नातील राज्य व भिकारी यासारख्या आहेत पण भगवंत जर त्यात नसेल तर सौभाग्य तिलकाशिवाय असणाऱ्या बाईप्रमाणे आहे. असे सर्व संत सांगत असता त्या भगवंताच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणे किती वाईट आहे. 


आशीर्वाद.

No comments: