🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १७४
भगवंताचे दास्य करायला जगाची आस सोडावी लागते. पण ते कठीण म्हणून दास्य करावे म्हणजे आस जाईल.
देहाने सर्वस्वाने त्याचे होऊन रहावे व मनाने स्मरण करावे.
जो स्वतःचा मालक होईल तोच भगवंताचा होईल. जो विकार ताब्यात आणील तो आपला मालक होईल.
विकारांना ताब्यात आणण्यासाठी विद्येचा उपयोग नाही. धर्म व निती यांचे आचरणच विकारांना ताब्यात आणेल.
बाहेरची परिस्थिती असेल तसे कर्तव्य करावे आणि मनात समाधान टिकवावे.
अत्यंत धर्माने वागा. कर्तव्याला चुकू नका व नाम सोडू नका.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment